Type Here to Get Search Results !

कोविडविरुद्धची लढाईः 'ही' टेक कंपनी भारताला देणार ५० कोटी रुपये

नवी दिल्लीः आयटी कंपनी कॅपजेमिनीने सोमवारी घोषणा केली की, भारतात कोविड संकटाचा सामना करण्यासाठी मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याशिवाय, कॅपजेमिनी भारतात महामारीविरोधात मदत करण्यासाठी युनिसेफला पाच कोटी रुपये दान देणार आहे. यात तीन ऑक्सिजन उत्पादन संयंत्रोची स्थापना केली जाईल. कंपनीने म्हटले की, ५० कोटी रुपयांचा फंडचा वापर कोविड मध्ये आयसीयू सुविधा, ऑक्सिजन जनरेशन प्लांट, अन्य लाँग टर्म मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरच्या निर्माणासाठी आणि मदत कार्यासाठी केला जाणार आहे. वाचाः याअंतर्गत कॅपजेमिनी आपल्या उपस्थितीच्या राज्यात राज्य सरकारच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा करीत आहे. यावरून हेल्थ केयर सुविधा दिली जाऊ शकते. कंपनीने म्हटले की, हे योगदान भारतात कॅपजेमिनीच्या सीएसआर निधीच्या अतिरिक्त असणार आहे. कॅपेजेमिनीचे सीईओ एमेन एजट यांनी म्हटले की, कॅपजेमिनी मध्ये आम्ही जे काही करीत आहोत. त्यात भारत याचे हृदय आहे. आमचे कर्मचारी आणि या कम्यूनिटीमध्ये आपण राहतो त्याचे आरोग्य आणि सुरक्षा हेच आपले पहिले कर्तव्य आहे. कोविड १९ ची दुसरी लाट भारतात खूप आव्हानात्मक आहे. आम्ही या महामारी विरुद्ध लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. वाचाः या कठिण वेळी कंपनी आपल्या सोशल रिस्पॉन्स युनिटद्वारे भारतातील मदतीसाठी तयार आहे. हे फंड सेंट्रल आणि राज्य सरकारला लाँग टर्मसाठी मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर करण्यास मदत करणार आहे. करोना महामारीच्या वाढत्या केसेसमुळे टेक्नोलॉजी कंपन्या लागोपाठ मदत करीत आहेत. यात मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, गुगल, शाओमी आणि ओप्पो सारख्या कंपन्यांनी आपली मदत जाहीर केली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विट करून भारताच्या मदतीसाठी १३५ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. तर फेसबुकचे सीईओ यांनी १ कोटी डॉलर देण्याची घोषणा केली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3thaKvE
https://ift.tt/3ubZWQF
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.